मंगलोर - गांधी हे आडनाव आपल्या नावापुढे होतं, म्हणूनच आपण राजकारणात यशस्वी झालो, असे प्रतिपादन काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी यांनी आज केले. मणिपाल महाविद्यालयात ते विद्यार्थ्यांशी बोलत होते.
सत्तेचा दुरूपयोग राजकारण्यांकडून होत असल्याबद्दल त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली.
माझ्या नावापुढे गांधी हे आडनाव जोडलं गेल्यानं तर माझा राजकीय प्रवास सुकर झाला, असेही त्यांनी सांगितले.महात्मा गांधींचे अनेक गुण समजून, ते अंगिकारण्याचा प्रयत्न मी करतो, किंबहुना कुठल्याही माणसामधले गुण स्वीकारणं मला आवडतं, असंही त्यांनी नमूद केलं.
समाजात बदल घडवण्यासाठी तरुणांनी विशेषत: सुशिक्षितांनी पुढे यायला हवे असं आवाहनही त्यांनी या विद्यार्थ्यांना केलं.