मुंबई : जगातील सर्वात मोठा तीन हजार एमएलडी क्षमतेचा पाणी शुध्दीकरण प्रकल्पावर सवकरच सुरूवात होत आहे.शहराच्या पूर्वेकडे वैतरणा नदीत हा प्रकल्प सुरू होईल.केंद्रीय शहर विकास मंत्री जयपाल रेड्डी यांच्या हस्ते उद्या (दि.29) प्रकल्पास शुभारंभ होईल.
या कार्यक्रमासाठी राज्यपाल एस.सी.जमीर व महापौर शुभा राऊळ देखील उपस्थित रहाणार आहेत.सहआयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की,वैतरणा नदीच्या मध्यभागी 459.59 करोड रूपयांचे तीन प्रकल्प हाती घेण्यात आले आहे.या प्रकल्पांअंतर्गत पाणी शुध्दीकरण,पाणी प्रक्रिया व पाणी वाटप अशा तीन टप्प्यांवर काम होणार आहे.