मुंबई : राज्य निवडणूक आयुक्त नंदलाल यांच्यावर दबाव आणला असल्याच्या वृत्तास मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नकार दिला.उलट देशमुख यांनी नंदलाल यांच्यावर खोटे बोलण्याचा आरोप केला.
मी कधीही लोकसभा निवडणूकांसाठी उमेदवार नव्हतो.त्यामुळे लातूर मतदार संघात आरक्षण बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,असे देशमुख यांनी आज प्रसिध्द केलेल्या पत्रकात सांगितले आहे.