ठाणे - जगातील कोणत्याही भागात काम करा किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करा परंतू तूमच्या मातृभाषेचा विसर पडू देऊ नका, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांना आज तरूणांना दिला.
येथे तीन दिवसीय करिअर एक्सपोचे उद्घाटन समारंभाप्रसंगी त्यांनी हे मोलाचे बोल उपस्थित विद्यार्थ्यांना सुनावले. कोणतीही नोकरी कमी प्रतीची नसते, त्यामुळे प्रथम मिळेल ती नोकरी मिळवा नंतर भविष्यात कोणती नोकरी करायची ते ठरवा.
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतही मराठी भाषा जिवंत राहणार आहे, त्यामुळे जे लोक तिच्या मरण्याच्या गोष्टी करतात त्यांची तोंड कालांतराने बंद होतील, असे ठाकरे म्हणाले.
सत्यजित रे व रविन्द्रनाथ टागोर यांचे दाखले देत ठाकरे म्हणाले की, या लोकांनी त्यांच्या मातृभाषेत उल्लेखणीय कामगिरी करून दाखविली आहे.