यंदा मान्सूनचे लवकर आगमन
Monday, May 12, 2008 16:00 [IST]

नवी दिल्ली - देशातील शेतक-यांच्या दृष्टीने वरदान असणा-या नैऋत्य मोसमी पावसाचे यंदा पाच दिवस आधीच भारतीय भूमीवर आगमन झाले आहे. यंदा या मान्सूनने दक्षिण अंदमानचा समुद्र आणि दक्षिण पूर्वेकडील बंगालच्या उपसागरात आपले आगमन केले आहे.

मान्सूनच्या आगमनामुळे अंदमान आणि निकोबार बेटांवर गेल्या दोन दिवसांपासून तुरळक ते जोरदार पाऊस पडत असून मोसमी वारेही वाहायला लागले आहेत. मान्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्याने या भागावर तो लवकरच स्थिर होईल, असा अंदाज भारतीय हवामानखात्याने वर्तवला आहे.

देशातील 23 कोटी शेतक-यांचा उदरनिर्वाह ज्यावर चालतो त्या मान्सूनचे यंदाही प्रमाण 99 टक्क्यांच्या आसपास राहणार असल्याचा दिलासादायक अंदाजही वेधशाळेने व्यक्त केल्याने शेतक-यांच्या मनात आनंदाचे वातावरण आहे. नेहमी एक जूनच्या आसपास येणारा हा पाऊस केरळच्या किनारपट्टीवर यंदा एक आठवडा आधी धडकणार असल्याचाही अंदाज आहे.


Source : PTI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम