पुणे - उस्मानाबादजवळ एक कार आणि मालट्रकची आज सकाळी धडक होऊन झालेल्या अपघातात सहा जणा जागीच ठार झाले. पोलीसांनी ही माहिती दिली. कारमधील सर्वजण एका खाजगी कंपनीत काम करणारे होते. ते कारमधून मुंबईहून हैदराबादकडे निघाले असताना उस्मानाबादच्या तुळजापूर तालुक्यातील अणदूर गावाजवळ त्यांच्या कारला समोरून येणा-या ट्रकने धडक दिली. पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातातील मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही.