मुंबई - गोपीनाथ मुंडे यांच्या बंडानंतर मुंबईचे प्रदेशाध्यक्ष सोडावे लागलेल्या आमदार मधू चव्हाणांचे भाजपाने अखेर पुनर्वसन केले असून त्यांची राज्य भाजपा प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांची मुंबई प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने नाराज झालेल्या गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाविरुद्ध बंडाचे निशाण फडकावल्याने भाजपाच्या गोटात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर चव्हाण यांची तडकाफडकी मुंबईच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. मात्र या प्रकाराचा चव्हाण यांनी खेद व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांचे राज्य प्रदेश सरचिटणीसपदी पुनर्वसन करण्यात आले आहे.