कोलकता - कोलकता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरूक खान व माझ्यात कोणत्याही प्रकारचा वाद नाही, आमच्यासंबंधी उठलेल्या बातम्या खोटया व निराधार आहेत, असे संघाचा कर्णधार सौरभ गांगूली याने स्पष्ट केले आहे.
चेन्नई विरूध्द 18 मे रोजी झालेल्या सामन्यात सौरभ ने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता जेव्हा की संघाने प्रथम गोलंदाजी करावी, अशी शाहरूखची इच्छा होती. संघ या सामन्यात हारल्यानंतर शाहरूखने ड्रेसिंग रूममध्ये त्याचा राग व्यक्त केला तेव्हा या दोघांमध्ये भांडण झाल्याचे एका वृत्तवाहिनीने प्रसारित केले होते.
पंरतू या बातम्या खोटया व निराधार असे सांगून गांगूली म्हणाला की, शाहरूख व माझ्यात कोणताही वाद नाही.