नवी दिल्ली- मनमोहन सिंग सरकारने संसदेतील बहुमत गमावले आहे, अशी टिप्पणी विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली आहे. सरकारने त्वरित संसदेचे सत्र बोलवावे व विश्वासमत सिद्ध करावे अशी मागणीही त्यांनी आज बातमीदार परिषद घेऊन केली आहे.
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दोन परस्परविरोधी तत्त्वे असणा-या घटकपक्षांनी सरकारला गेल्या 18 महिन्यांपासून अपंग केले आहे अशी टीका अडवाणी यांनी केले. समाजवादी पार्टी व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी विश्वासर्हता गमावली आहे, असेही ते म्हणाले.
सत्ता टिकवण्यासाठी सरकार कोणत्याही गोष्टीचा व्यापार करण्यास तयार झाले आहे, असा आरोप अडवाणींनी केला.