मुंबई - मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्याला आलेल्या धमक्यांना भीक घालत नसल्याचे सांगत धमकी देणा-यांचे मनसुबे उधळून लावले.
मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांना दहशतवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा मेल पाठवला आहे, त्या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी आपण या धमक्यांना घाबरत नसल्याचे सांगितले.
मुस्लीम कलाकारांना चित्रपटात काम न करण्याचा इशारा या धमकी देणा-या मेलच्या पार्श्वभूमीवर पुरेपूर सुरक्षाव्यवस्था देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
देशमुख यांनी राज्यातील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला. जनतेने सुरक्षायंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.