श्रीनगर/नवी दिल्ली - तब्बल 16 तास दोन्ही बाजूंकडून झालेल्या धुवांधार गोळीबारानंतर भारत आणि पाकिस्तानने सायंकाळी पांढरे निशाण फडकावले. या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला आहे. मात्र पाकिस्तानने पाच वर्षापूर्वी झालेल्या शस्त्रास्त्रबंदी कायद्याचे पालन करावे, असे भारताने बजावले.
पाकिस्तानकडून अनेकदा प्रत्यक्ष सीमारेषेवर शर्तींचा भंग झाला आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारने दोन्ही देशांदरम्यानची शांतीप्रक्रिया बाधित होऊ नये,याची काळजी घ्यावी, असे भारताने बजावले.